पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेख क्र.3 ‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे

‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे  मराठी विभाग,  मिलिंद कला महाविद्यालय,  नागसेनवन, औरंगाबाद मो. 9421678635 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. ही घटनाच तत्कालीन अंध:कारमय मराठवाड्याची स्थिती पाहता क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कार्यातूनच प्रत्यक्षपणे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यामुळेच तर अक्षर ज्ञान नसलेल्या हजारो दलितांच्या जीवनात क्रांतिकारी बदलाचे वारे वाहू लागले आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाच्या निळ्या पहाटेचे तांबंड फुटू लागले. हजारो वर्ष अज्ञानाच्या अंध:काराच्या गर्तेत जीवन जगणाऱ्या दलित समाजात ज्ञानाची स्थित्यंतरे झाली आणि याच स्थित्यंतराचा परिणाम म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘मिलिंद’च्या सृजनशील, संस्कारशील, मातीत                  डॉ. बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेतून बीजारोपण हो...

लेख क्र. 2 मिलिंद महाविद्यालयाची अमॄतमहोत्सवी वाटचाल.

मिलिंद महाविद्यालयाची अमृत महोत्सवी वाटचाल प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे  मराठी विभाग  मिलिंद कला महाविद्यालय,  नागसेनवन, औरंगाबाद मो. 9421678635 “जगप्रसिद्ध अजिठ्यांची लेणी सांगते तथागताची गाथा,  ‘मिलिंद’ च्या गौरवशाली परंपरेपुढे सदैव झुकतो माथा ।।’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ची स्थापना केली या संस्थेने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे 19 जून 1950 रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आज       दि. 19 जून 2024 रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला 74 वर्षे पूर्ण होऊन मिलिंद महाविद्यालय त्याच्या अमृत (75 व्या) महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही आपल्या सर्व आंबेडकरी अनुयायांसाठीच नव्हे तर मिलिंदच्या सृजनशील मातीतून संस्कारशील शिक्षणाची, ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या प्रचंड गुणवत्तेच्या बळावर समाजजीवनात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा निर्माण केला व ‘मिलिंद’च्या संस्काराची महती आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिली अशा प्रत्येक ‘मिलिंदियन’ विद्यार्थ्यांसाठी हा क्षण...