लेख क्र.3 ‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे
‘मिलिंद’च्या साहित्यिक परंपरेतील संवेदनशील ह्दयाचा सह्दयी लेखक : प्र. ई. सोनकांबळे प्रा. डॉ. मिलिंद माणिकराव वाव्हळे मराठी विभाग, मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद मो. 9421678635 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. ही घटनाच तत्कालीन अंध:कारमय मराठवाड्याची स्थिती पाहता क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कार्यातूनच प्रत्यक्षपणे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यामुळेच तर अक्षर ज्ञान नसलेल्या हजारो दलितांच्या जीवनात क्रांतिकारी बदलाचे वारे वाहू लागले आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाच्या निळ्या पहाटेचे तांबंड फुटू लागले. हजारो वर्ष अज्ञानाच्या अंध:काराच्या गर्तेत जीवन जगणाऱ्या दलित समाजात ज्ञानाची स्थित्यंतरे झाली आणि याच स्थित्यंतराचा परिणाम म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘मिलिंद’च्या सृजनशील, संस्कारशील, मातीत डॉ. बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेतून बीजारोपण हो...